शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चुकीच्या सर्वेक्षणाची जनतेला शिक्षा : नवीन शौचालयांसाठी निधी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:42 IST

गारगोटी : संपूर्ण भुदरगड तालुका कागदोपत्री हागणदारीमुक्त म्हणून दाखविण्यासाठी नव्वद टक्के कुटुंबे शौचालययुक्त दाखविण्याचा आतताईपणा करून शौचालय पाहणी

शिवाजी सावंत ।गारगोटी : संपूर्ण भुदरगड तालुका कागदोपत्री हागणदारीमुक्त म्हणून दाखविण्यासाठी नव्वद टक्के कुटुंबे शौचालययुक्त दाखविण्याचा आतताईपणा करून शौचालय पाहणी करण्यासाठी गेलेल्या अधिकाºयांनी गोरगरीब जनतेला पुन्हा एकदा उघड्यावर शौचास पाठविण्याची जणू तजवीज केली आहे. शासन आणि अधिकाºयांच्या चुकीच्या सर्वेक्षणाची शिक्षा तालुक्यातील गरीब जनतेला भोगावी लागत आहेत.

२0१२ मध्ये हागणदारीमुक्त गावे करण्यासाठी शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला. या अभियानात शंभर टक्के ग्रामपंचायती सहभागी होण्यासाठी त्यांना बक्षिसे आणि शौचालय बांधण्यासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून दिला, तर हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलीस कारवाईचा बडगा उगारला गेला. परिणामी, खेडेगावात सकाळी शेतात, रस्ते आणि पाणंदीच्या कडेने शौचास जाणाºयांची संख्या दिवसेंदिवस कमी कमी होत गेली. पोलीस कारवाईला घाबरून अनेकांनी लवकरात लवकर शौचालये बांधण्यास सुरुवात केली.

यावेळी शासनाने किती लोकांजवळ शौचालय आहेत, हे पाहण्यासाठी सर्वेक्षण करायला सुरुवात केली. यावेळी सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाºयांनी शेजारी-पाजारी असलेल्या शौचालयात शेजारी जातात, असे तपासणी अहवालात नमूद केले. यामुळे तालुक्यात जवळपास नव्वद टक्के लोकांच्या घरी शौचालय असल्याचा आभास निर्माण झाला. प्रत्यक्षात मात्र ७0 टक्के लोकांच्या घरीच शौचालये आहेत. २0१४ मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर फेरसर्व्हे होणे आवश्यक होते; पण ते आजतागायत झालेले नाही. त्यामुळे विभक्त झालेल्या भावाभावांत शौचालयांची संख्या कमी होत गेली आहे.

फणसवाडी येथील वंचित लाभार्थी महादेव रब्बे यांच्याशी संपर्क साधला असता ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, फणसवाडीसारख्या खेडेगावातील रघुनाथ देसाई, राजेंद्र गोरे, सत्तापा दिनकर चव्हाण, सत्तापा जोती चव्हाण, धोंडिबा गोरे, तुकाराम चव्हाण, मधुकर शिंदे, शामराव गोरे, महादेव रब्बे, आनंदा देसाई, संजय देसाई अशा ११ गरीब लोकांनी शौचालये स्वखर्चाने बांधली आहेत. गेले अनेक दिवस आम्ही पंचायत समितीच्या अधिकारी आणि पदाधिकाºयांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी भेटत आहोत. शासनाच्यावतीने करण्यात आलेला सर्र्व्हे चुकीचा आहे. यात आमचा काय दोष आहे? स्वच्छ भारत अभियानांतर्गत आम्हाला निधी मिळण्यासाठी पात्र असतानादेखील आम्ही वंचित राहिलो आहोत,याला जबाबदार कोण? आम्हाला निधी उपलब्ध करून न दिल्यास आम्ही उपोषण करण्याच्या तयारीत आहोत.याप्रश्नी सभापती सरिता वरंडेकर यांच्याशी चर्चा केली असता त्या म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांसोबत कागदोपत्री व्यवहार सुरू झाला आहे. जास्तीतजास्त प्रमाणात निधी उपलब्धकरून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, लवकरच काही प्रमाणात निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.पंचायत समितीला निधी कधी मिळणार२0१२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार भुदरगड तालुक्यात ३२,२८५ कुटुंब संख्या आहे. त्यापैकी २५१६५ कुटुंबांत शौचालये आहेत, तर ७१२0 कुटुंबांमध्ये शौचालये नाहीत. याशिवाय विभक्त झालेल्या कुटुंबांतील सदस्यांकडेदेखील शौचालये नाहीत. चालूचा सर्र्व्हे न झाल्याने अनेक कुटुंबांकडे शौचालय नसल्याची नोंद सरकारी दप्तरी आणि आॅनलाईनवर अद्ययावत केली गेलेली नाही. अशा परिस्थितीत ज्या ज्या लाभार्थ्यांनी शौचालये बांधली आहेत त्यांना पंचायत समितीकडे निधी उपलब्ध कधी होणार, हे पाहण्यासाठी चकरा माराव्या लागत आहेत.