शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

चुकीच्या सर्वेक्षणाची जनतेला शिक्षा : नवीन शौचालयांसाठी निधी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:42 IST

गारगोटी : संपूर्ण भुदरगड तालुका कागदोपत्री हागणदारीमुक्त म्हणून दाखविण्यासाठी नव्वद टक्के कुटुंबे शौचालययुक्त दाखविण्याचा आतताईपणा करून शौचालय पाहणी

शिवाजी सावंत ।गारगोटी : संपूर्ण भुदरगड तालुका कागदोपत्री हागणदारीमुक्त म्हणून दाखविण्यासाठी नव्वद टक्के कुटुंबे शौचालययुक्त दाखविण्याचा आतताईपणा करून शौचालय पाहणी करण्यासाठी गेलेल्या अधिकाºयांनी गोरगरीब जनतेला पुन्हा एकदा उघड्यावर शौचास पाठविण्याची जणू तजवीज केली आहे. शासन आणि अधिकाºयांच्या चुकीच्या सर्वेक्षणाची शिक्षा तालुक्यातील गरीब जनतेला भोगावी लागत आहेत.

२0१२ मध्ये हागणदारीमुक्त गावे करण्यासाठी शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला. या अभियानात शंभर टक्के ग्रामपंचायती सहभागी होण्यासाठी त्यांना बक्षिसे आणि शौचालय बांधण्यासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून दिला, तर हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलीस कारवाईचा बडगा उगारला गेला. परिणामी, खेडेगावात सकाळी शेतात, रस्ते आणि पाणंदीच्या कडेने शौचास जाणाºयांची संख्या दिवसेंदिवस कमी कमी होत गेली. पोलीस कारवाईला घाबरून अनेकांनी लवकरात लवकर शौचालये बांधण्यास सुरुवात केली.

यावेळी शासनाने किती लोकांजवळ शौचालय आहेत, हे पाहण्यासाठी सर्वेक्षण करायला सुरुवात केली. यावेळी सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाºयांनी शेजारी-पाजारी असलेल्या शौचालयात शेजारी जातात, असे तपासणी अहवालात नमूद केले. यामुळे तालुक्यात जवळपास नव्वद टक्के लोकांच्या घरी शौचालय असल्याचा आभास निर्माण झाला. प्रत्यक्षात मात्र ७0 टक्के लोकांच्या घरीच शौचालये आहेत. २0१४ मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर फेरसर्व्हे होणे आवश्यक होते; पण ते आजतागायत झालेले नाही. त्यामुळे विभक्त झालेल्या भावाभावांत शौचालयांची संख्या कमी होत गेली आहे.

फणसवाडी येथील वंचित लाभार्थी महादेव रब्बे यांच्याशी संपर्क साधला असता ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, फणसवाडीसारख्या खेडेगावातील रघुनाथ देसाई, राजेंद्र गोरे, सत्तापा दिनकर चव्हाण, सत्तापा जोती चव्हाण, धोंडिबा गोरे, तुकाराम चव्हाण, मधुकर शिंदे, शामराव गोरे, महादेव रब्बे, आनंदा देसाई, संजय देसाई अशा ११ गरीब लोकांनी शौचालये स्वखर्चाने बांधली आहेत. गेले अनेक दिवस आम्ही पंचायत समितीच्या अधिकारी आणि पदाधिकाºयांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी भेटत आहोत. शासनाच्यावतीने करण्यात आलेला सर्र्व्हे चुकीचा आहे. यात आमचा काय दोष आहे? स्वच्छ भारत अभियानांतर्गत आम्हाला निधी मिळण्यासाठी पात्र असतानादेखील आम्ही वंचित राहिलो आहोत,याला जबाबदार कोण? आम्हाला निधी उपलब्ध करून न दिल्यास आम्ही उपोषण करण्याच्या तयारीत आहोत.याप्रश्नी सभापती सरिता वरंडेकर यांच्याशी चर्चा केली असता त्या म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांसोबत कागदोपत्री व्यवहार सुरू झाला आहे. जास्तीतजास्त प्रमाणात निधी उपलब्धकरून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, लवकरच काही प्रमाणात निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.पंचायत समितीला निधी कधी मिळणार२0१२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार भुदरगड तालुक्यात ३२,२८५ कुटुंब संख्या आहे. त्यापैकी २५१६५ कुटुंबांत शौचालये आहेत, तर ७१२0 कुटुंबांमध्ये शौचालये नाहीत. याशिवाय विभक्त झालेल्या कुटुंबांतील सदस्यांकडेदेखील शौचालये नाहीत. चालूचा सर्र्व्हे न झाल्याने अनेक कुटुंबांकडे शौचालय नसल्याची नोंद सरकारी दप्तरी आणि आॅनलाईनवर अद्ययावत केली गेलेली नाही. अशा परिस्थितीत ज्या ज्या लाभार्थ्यांनी शौचालये बांधली आहेत त्यांना पंचायत समितीकडे निधी उपलब्ध कधी होणार, हे पाहण्यासाठी चकरा माराव्या लागत आहेत.